Skip to main content

Posts

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा
Recent posts

कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?

कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!?   कुठे हरवल्या त्या शेणामातीच्या भिंती... कायमच्या... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो वाटायचा पाटा... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती मातीची चूल... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो चुलीतला धूर... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती वाटेवरची धूळ... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती गोठ्यातली गुरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती दंगा करणारी पोरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? #Irshalvadi 🥺 #Irshalwadi Landslide 😓 #Bhavpurna Shradhanjali 🙏 ©  डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील M.B.B.S., M.D. (Community Medicine) दि. २५ /०७/२०२३.

तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!!

''तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!! "काय बे... नाचला का लेका आत्ता...!?" तो म्हणाला... "नाही...!" मी म्हणालो... काऊन बे...!? काऊन नाही नाचला...!? तर ते ७-८ वर्षांचं पोरग म्हणालं... "मी मुसलमान नाही ना...!?" आत्ता थोड्या वेळापूर्वीचं माझ्या मित्राच्या घराखालून मिरवणूक जात होती. कदाचित मोहरम जवळ आल्यामुळे सवारी घेऊन मिरवणूक वाजत गाजत सवारी बसवायला जात होती. घराखालून मिरवणूक पुढे गेली आणि मी माझ्या घरी परत जायला खाली आलो... आणि वरील प्रसंग घडला. " थोड्या वेळासाठी  काळजात चर्रर्रर्र झालं माझ्या...!!! आणि मग ह्या गोष्टीचा विचार करत करतचं मी घरी परतलो... लहाणपणी माझ्याही गावात मोहरम आला की सवारी बसायची. ७-८ वर्षाचाचं असेल मी तेंव्हा... सिंदखेड आणि लिंगमपेठ अशा दोन्ही भागात सवारी बसायची. आणि ती सवारी हमेशा हिंदू व्यक्तीच्याचं घरी बसायची. ह्याचे कारण काय होते हे मला अजूनही माहिती नाही किंवा ते माहिती करून घ्यायचा मी प्रयत्नही कधी केला नाही. गावातील सर्व हिंदू-मुस्लिम आणि बौद्धधर्मीय लोक मिळून ह्या मोहरममध्ये स

याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...!

याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! तुम्ही प्रवासाला जात असता, भटकंती करत राहता, तुम्ही वाचत असता सतत काहीतरी, जगण्याच्या हाका पडत असतात तुमच्या कानावर कधीमधी, कधी तरी देत असता तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! स्वत:चं मन न मारता, तडजोड न करता जगता तुम्ही, मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही स्वीकारता तुम्ही, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! सवयीेंचे गुलाम बनत नाही तुम्ही, रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालत नाही तुम्ही, कधीमधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत असता तुम्ही, चुकून कधी वाट चुकत असता तुम्ही, परक्या अनोळखी माणसांना भेटत असता तुम्ही, त्यांच्याशी हितगुज करत असता तुम्ही, अंगावर चढवत असता नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! छातीत धडधडत असतं तुमच्या, तुमचं पॅशन काय हे सतत आठवत राहत तुम्हाला, भावनांचा अतिरेकी कल्लोळ जाणवत असतो तुम्हाला, आतल्या आत, तुटत असत पोटात, येत राहत इतरांसाठी आणि स्वतःसाठीही तुमच्या डोळ्यात पाणी, याचा अर्थ तुम्ही जगायला शिकताय... हळूहळू...! या कामात मन रम

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे... २१ व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट... "देखो २००० जमाना आगया" हे आमिर खानचं मेला पिक्चरमधील गाजलेलं गाणं त्यावेळेस टीव्हीवर 'चित्रहार आणि छायागीत' मध्ये हमेशा लागायचं... आणि "मेला" पिक्चरसुद्धा शुक्रवारी रात्री ९:३० वाजता बऱ्याचवेळा दूरदर्शनवर लागायचा... साधारण ६-७ वर्षांचा असेल मी तेंव्हा... त्यावेळी गावातील इतर मुलां-मुलींप्रमाणे मी देखील सिंदखेड ह्या माझ्या नाल्याकाठच्या गावात हसत-खेळत बेफिकीर बागडायचो... दुनियादारीशी  माझा  अजूनतरी तरी तसा संबंध आला नव्हता ... आधीच मराठवाड्यातलं गाव अन त्यात आमच्या गावात असलेली पांढरीची जमीन म्हणजे दुष्काळात तेरावा महिना... त्यावेळेस पावसाळ्यात पाऊस आल्यावर साधारणतः डिसेंबर- जानेवारीपर्यंत पाण्याची चणचण जाणवायची नाही. पण फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरु झाल्यामुळे गावात पाण्याची वानवा जाणवायला लागायची. त्यानंतर आमच्या गावात पाण्यासाठी एकच उपाय होता... तो म्हणजे आमच्या गावातील नाला... माझ्या गावाची ठेवण सुद्धा विशिष्ठ अशीच आहे. गावाभोवती नाला यू आकाराचा आहे. गावाला नाला गोल फिरक