Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा
कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवल्या त्या शेणामातीच्या भिंती... कायमच्या... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो वाटायचा पाटा... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती मातीची चूल... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो चुलीतला धूर... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती वाटेवरची धूळ... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती गोठ्यातली गुरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवली ती दंगा करणारी पोरं... कायमची... परत कधीच न गावण्यासाठी...!? कुठे हरवला तो भरलेला गाव... कायमचा... परत कधीच न गावण्यासाठी...!? #Irshalvadi 🥺 #Irshalwadi Landslide 😓 #Bhavpurna Shradhanjali 🙏 © डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील M.B.B.S., M.D. (Community Medicine) दि. २५ /०७/२०२३.