Skip to main content

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...!


एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती.


असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकानुसार नक्कीच वेगळा आहे.


तर साधारण ऑक्टोबर २०२० मधील मला स्वतःला अंतर्बाह्य ढवळून काढणारी आणि बदलायला भाग पाडणारी ही घटना आहे. माझा मित्र कबीर उर्फ गणेश घुमरे मला भेटण्यासाठी औरंगाबादहून वर्धेला काही दिवसांकरिता आला होता. त्याचवेळी माझे दुसरे मित्र पवन पोहेकर हे देखील कबीरला आणि मला भेटायला नागपूरवरून आले होते. एके दिवशी पवनदा आणि कबीर वर्धेतील बुद्ध टेकडी येथे अनुज मुळे ह्यांना भेटायला आणि फिरायला गेले होते. तिथे ते गप्पा मारत असताना आपण महापुरुष का आणि कसे वाचले पाहिजेत ह्या विषयावर बोलत बसले. त्याचवेळी आणखी एक युवक बुद्ध टेकडीवर उपस्थित होता आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टी मन लावून ऐकत होता. बोलणं संपल्यावर तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला... ''सर, हा कन्सेप्ट आपल्याले बहुतच आवडला... अन आपल्याले तो इथे वर्धेत सुरु करायचा आहे..." इतकं बोलून त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि आल्यामार्गी सर्व परत निघाले.


कबीरने घरी आल्यावर ही गोष्ट मला सांगितली... पण आमच्या दोघांनाही वाटलं कि "हा कुठं कॉल करलं रे आपल्याला... जाऊ दे...!" म्हणून आम्ही दोघे आपल्याच धुंदीत विसरून गेलो. पण सात-आठ दिवसांनी अचानक त्या युवकाचा आम्हाला कॉल आला... आणि तो चक्क आम्हाला भेटायला सेवाग्रामला माझ्या घरी आला. आणि आमचं ठरलं कि आता मीटिंग घ्यायची म्हणजे घ्यायचीच...! तो युवक म्हणजे माझा आजचा वर्धेतील एक चांगला मित्र आणि चळवळीतला सहकारी कपिल चंदनखेडे होय...!


आणि अशाप्रकारे आमची पहिली मीटिंग दि. ०८ नोव्हेंबर २०२० रोजी राज खेलकर या मित्राच्या छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, वर्धा येथे कपिल आणि निखिल कुंभारे ह्या मित्रांच्या पुढाकाराने संपन्न झाली. ह्या मीटिंगमध्ये कबीरने आम्हा सर्वांना ''महापुरुष का व कसे वाचायचे आणि चळवळीसाठी वाचन हे किती नितांत गरजेचं आहे'', ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. तेंव्हापासून आजपर्यंत आमच्या जवळपास ७२ आठवडी अभ्यास मैत्री सत्रे झाली आहेत... ज्याची माहिती आम्ही नियमितपणे सोशल मीडिया वर देतचं असतो...! प्रत्येक सत्रामध्ये बहुजनांचे आदर्श महापुरुष व महान स्त्रिया आणि चळवळीच्या अभ्यासाचेचं विषय असल्यामुळे आणि एकंदरीत सोयिस्कर जावं म्हणून ही सर्व सत्रे आम्ही Renaissance Study Club ह्या शिर्षकाखाली घेत असतो. (Renaissance ह्या फ्रेंच शब्दाचा मराठी अर्थ 'प्रबोधन' असा होतो.)


Renaissance स्टडी क्लब सुरु करण्याचा आमचा मूळ हेतू  हा चळवळीचा अभ्यास करणे आणि ती समजून घेणे हा असला तरी त्याचे  इतर ही असे काही उपयोग आणि बदल आमच्या आयुष्यात झाले ते इथे मला खालीलप्रमाणे नमूद करावेसे वाटतात.


१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्णपणे वाचून आणि समजून घेण्याची दृढ इच्छा निर्माण झाली.

२. बहुजन महापुरुष आणि महान स्त्रियांच्या समाजोपयोगी कार्याची ओळख झाली.

३. इंग्रजी भाषेचं ज्ञान वृद्धिंगत झाले. (English Language Skills Improvement: Listening-Speaking-Reading-Writing)

४. भाषण आणि संभाषण कौशल्य वृद्धिंगत झाले.

५. सर्वांमध्ये वाचनाची आवड आणि सवय निर्माण झाली.


आमच्या ह्या समूहाचं नावात आम्ही फक्त बुक क्लब असा उल्लेख न करता स्टडी क्लब असं असण्याचं  कारण कि आम्ही इथे फक्त पुस्तकचं वाचत नाही तर चळवळीच्या अनुषंगाने इतर अनेक बाबी आणि मुद्द्यांचीही चर्चा करत असतो. दृढ अर्थाने समाजात असे मत बनले आहे कि स्टडी म्हणजे फक्त अकॅडेमिक अभ्यास. आम्हाला हेही मत बदलायचे होते कि चळवळीचा अभ्यास म्हणजे फक्त वाचन नव्हे तर हा देखील एकप्रकारचा अभ्यासचं असतो. आणि बहुजन विचारधारा ही फक्त वाचली नाही तर अभ्यासली पण गेली पाहिजे कारण ती आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कुठेच दिसत नाही. आणि तसंही फक्त पुस्तक वाचूनच सर्वकाही होणार नाही तर ती पुस्तकं आपल्याला जगता आली पाहिजे आणि त्याद्वारे आपले आयुष्यदेखील समृद्ध करता आलं पाहिजे, हे आमचं एक प्रांजळ मत आहे.


आजपर्यंत झालेल्या जवळपास ७२ सत्रांमध्ये आम्ही ३६ सत्रे ही बुद्ध आणि त्यांच्या धम्म ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित इंग्रजी ग्रंथावर घेतली आहेत जेणेकरून आमचं इंग्रजी भाषा आणि बुद्धांचा धम्म ह्या दोन्हीचं ज्ञान वृद्धिंगत होईल. आणि बऱ्याच अंशी ते झालंही आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा फक्त एक धर्म नसून तो Way of Life म्हणजेच जगण्याचा एक समृद्ध मार्ग आहे... असं आमचं प्रामाणिक मत आतापर्यंत झालेल्या मैत्री सत्रांच्या अनुभवावरून बनलेलं आहे. बाकी उरलेल्या ३६ सत्रात आम्ही बऱ्याच बहुजन आदर्शांची जीवनचरित्रे आणि कार्य अभ्यासली आहेत, ज्याबद्दल मी नंतर सविस्तर लिहीनच... पण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्ही जास्तीत जास्त आणि नियमितपणे वाचण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, कारण बहुजनांच्या मानवतावादी चळवळीत त्यांचं योगदान 'अतुलनीय' असंच आहे... मानवतावादी बहुजन चळवळीला आज जो काही आकार आणि उकार आहे तो या दोन महान आदर्शांमुळेच...!


इथे मला आवर्जून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे ती म्हणजे फक्त पुस्तकं वाचूनच चळवळ जिवंत राहते अस काही नाही किंवा चळवळीचा फक्त तोच एकमात्र मार्ग आहे असंही नाही. चळवळीत जास्त योगदान तर बाबासाहेबांना अभिप्रेत इतर अनेक कामं करून, रस्त्यावर उतरून आणि आंदोलन करून वाचन न करणारे लोकंही देत असतात. त्यामुळे आम्ही किंवा मी पुस्तकं वाचतो आणि फक्त त्यामुळेच चळवळ जिवंत राहते, असा काही पायंडा देखील आम्हाला पाडायचा नाही आहे. बाबासाहेब वाचून, त्यांनी सांगितलेल्या आदर्शांना स्वतःच्या जीवनात उतरवून आणि इतरांनाही बुद्ध-शिव-फुले-शाहू-पेरियार-आंबेडकर समजावून सांगण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आयुष्यभर तो असाच कायम राहील. इतरांनी ह्याच अनुकरण करावं कि करू नये, आंबेडकर वाचावेत कि वाचू नयेत... हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मला इथे एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायची आहे ती म्हणजे आपण जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचले आणि जीवनात उतरवले, मग ते कशाही प्रकारे वाचा किंवा आत्मसात करा... तर आणि तरचं ही मानवतावादी चळवळ जिवंत राहील...!


आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त चळवळीसाठीचं बाबासाहेब आणि इतर बहुजन आदर्श व्यक्तिमत्वं वाचणं गरजेचं नाही... जोपर्यंत भारतात विषमता आहे... तो पर्यंत ही मानवतावादी चळवळ तर कायम चालत राहीलचं... पण स्वतःचा व्यक्तिगत आणि सामाजिक विकास साधण्यासाठीही ह्यांना वाचणं अतंत्य निकडीचं आहे...! आणि सध्याचे गढूळ आणि द्वेषयुक्त असे सामाजिक व राजकीय वातावरण बघता... मला वाटत कि खरंच ह्याव्यतिरिक्त दुसरा काही एक पर्याय नाही आहे... इट्स द नीड ऑफ द टाइम...!


त्यामुळेच... डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचाल तरंच वाचाल...!


#Dr.BabaSaheb Ambedkar 💙


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. ३१/०३/२०२३.

Comments

  1. Khup chan 👌👌👌❤️❤️

    ReplyDelete
    Replies
    1. डॉक्टर साहेब, सुंदर कार्य आहे. अभिनंदन! उत्तरोत्तर भव्य दिव्य मानवतावादी कार्य घडो!

      Delete
  2. Subak ani chhan vaky rachna,

    ReplyDelete
  3. Very good and great activity which need to follow all. Dr. Kapil Patil

    ReplyDelete
  4. SUPER !❤❤❤❤❤❤❤❤

    ReplyDelete
  5. Super👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान सर 👌👌🌹🌹

    ReplyDelete
  7. Khup chan sir👌👌

    ReplyDelete
  8. Hi Pranit. I could not reply to your message as I was busy with office work But today I took the time and read your blogs. I tell you that you are a young and educated voice of the Ambedkari community. I believe that every event in life is an opportunity, the best way is to get up and do something. You inspired us. I always see your activities and posts on Facebook.
    Good share... Again I love your blog... You are doing a really great job. Wish to see much more... so keep it up!!

    Sumedh

    ReplyDelete
  9. टीका करू का स्तुती हा प्रश्न गौण आहे.

    आपण अभिव्यक्ती मध्ये पारंगत होत आहात.. हेच अधरेखित करावे वाटले.

    मग पुढचा टप्पा हा विषय वस्तू चा आपल्या दृष्टिकोनातून अभ्यास करून समाज मनाचे आकलन करावे.
    अन् ज्ञानरूपी दिव्याचे रूप जगत इतर जे गरजू जिज्ञासू जसे मी यांना प्रकाशित करावे.

    माझ्या सारख्या झोपेचे सोंग करणारी माणसे विचाराचे injection देवून जागे करावे नाही तर कायमचे झोपवावे.

    इति आत्मभान

    #जाहीरहितगुज

    ReplyDelete
  10. मृदगंधः खरंच वाचणीय आहे.वस्तूस्तिती व वास्तविकतेच उत्कृष्ट उदाहरण यापेक्षा वेगळे असुच शकत नाही.रक्तदान असो की समृद्धी वरील अपघातावेळी तुमच्या सर्व टीम कडून गरजुना करण्यात येणारी मदत व धडपड खरंच अभिनंदनिय आहे .Blog वाचून आनंद झाला.पुढेही बरेचसे काही करायचे आहे.यासाठी खुपखुप शुभेच्छा ! ! ! एकमेकांना जोडत जा प्रवृर्त करीत जा परिवर्तन नक्कीच होईल.धन्यवाद

    ReplyDelete
  11. Super👌👌👌

    ReplyDelete
  12. Super 😊 sir

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा