मैत्री-विवाह आज माझ्या आंतरजातीय मैत्री विवाहाला १ वर्ष पूर्ण झाली! होय मैत्री विवाहच...! मुद्दामच प्रेमविवाह हा जोडशब्द नाही लिहिला...! असो... ह्या मागील एका वर्षात बुद्ध-शिव-फुले-शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बऱ्याच गोष्टी बोलून-करून मला विचार करण्यास भाग पाडले! जसे की, प्रणितकडे किंवा माझ्या घरच्यांकडे लोकांचे बोलणे यायचे की, का तुम्ही दुसऱ्या जातीची मुलगी केली? सत्यशोधक विवाहच का केला? लग्नात नातेवाईकांचा मान-पान नाही केला! जोडा जमत नाही! न शोभणारी मुलगी केली! (मुळात मी लठ्ठ आहे!) नवरा डॉक्टर आहे तर मुलगी पण डॉक्टरचं करायला पाहिजे होती! न कमावती मुलगी केली... इत्यादी, इत्यादी! आणखी यादी बरीच मोठी आहे! या सर्व गोष्टी पाहता मला प्रश्न पडायला लागले की चांगले आचरण, निस्वार्थ मन ह्याला काहीच किंमत नाहीये का? (नातेवाईक आणि ते कोण असतात ते तिऱ्हाईत 4 लोक्स! त्यांच्यासाठी तर नाहीच असते वाटते!) लग्नानंतर बरेच जवळचे लोक मला म्हणायचे की थोडी बारीक हो... मला वाटायचं काळजीपोटी म्हणतात! (तसेही काळजीपोटी म्हणणारे आहेतकी म्हणा! नाहीत असे नाही!)
II कळले नाही कधी मृदगंधाचा एक झरा माझ्यातचं होता II माझी तृष्णा गल्लोगल्ली फिरत राहिली होती II